Monday, June 30, 2008

काश्मीर

काश्मीर मध्ये जे काही चालू आहे ते वाचून वाईट वाटतं. काय गरज होती जम्मू काश्मीर सरकारला हे सगळं करायची! आत्ता कुठे वातावरण थोडं शांत होऊ लागलं होतं. मधेच कशासाठी हे जमीन प्रकरण? पर्यटकांची सोय व्हायला हवी हे ठीक आहे, पण ते काम पर्यटन विकास मंडळ किंवा स्थानिक लोकांवर सोपवता येत नव्हतं का? मंदिराच्या ट्रस्टला जमीन देण्याचं काय कारण? आता पुन्हा सरकारने माघार तर घेतली आहे, पण दरम्यान वातावरण गढूळ व्हायचं ते झालंच! स्थानिक लोकांचा सरकार वरचा अविश्वास आणखी दृढ़ झाला, पर्यटकांचे हाल झाले. ज्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती त्यांनी ती घेतली.
आणि आता भाजपा/शिवसेनेनी जम्मू मध्ये दंगा सुरु केला आहे. आशा आहे की हे फार काळ चालणार नाही. आणि पुन्हा सगळं शांत होईल. पण खरंच, सामान्य लोकांचा जराही विचार न करणारया सरकारांचं आणि एकूणच सगळ्या राजकीय पक्षांचं काय करावं?